बुधवार, २५ जानेवारी, २०१२

तो आला होता कोठुनी, कळले नाही
तो गेला कोठे, तेही कळले नाही
तो आला होता-एकचि होते सत्य!!
तो आला होता, कसे वदावे सत्य?
तो आला होता, होता केवळ भास....

‘-अन स्वर्गामधुनि ईश्वर तो येईल,
येईल आणखी रूप नवे घेईल
संस्थापन करण्या नूतन युगधर्माची!!’
यावरी नको रे विसंबूस तू आता-
हो हरि-हर तूची, घेउनि त्रिशूळ-चक्रां!!!

‘कवितेने दिधले तुजला लौकिक, नाव-
कवितेने दिधले बहुत मानसन्मान
त्वां काय दिले रे, कवितेला-’ मी पुसता
तो वदला, ‘अवघे जीवन दिधले तिजला




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा