मंगळवार, २० डिसेंबर, २०११

‘अन माझ्या मागे काही काहि नुरावे,
रंग-रूप अथवा नाव, गावही जावे
जाव्यात पुसोनी अस्तित्वाच्या रेषा....’
वाटते तुवां ही निरीच्छतेची हद्द
परि त्यातचि ये मज उत्कट इच्छा-गंध!..

-शेवटी फळाला आले तप सर्वांचे
शहरात मिळाले छोटे घर भाड्याचे
मंडई, पिठाची गिरणी, पाणी, शाळा-
आवश्यक ते ते समीप सगळे होते,
अन दरापुढती स्मशानसुद्धा होते...

येताना होते दोन्ही डोळे मिट्ले
अन जातानाही तसेच होते मिटले
क्षण एक उघडले आणिक पुन्हा मिटले...
क्षण एक उघडले, आणिक पुन्हा मिटले
ते-तेच तेव्हढे, जीवन आहे इथले!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा